Friday, July 17, 2009

श्रावण मासी बहार आणे

आषाढी अमावस्येला दीप-पूजन झाल्यावर श्रावण महिना आणि ओघानेच आलेला वर्षा ऋतू सुरु होतो. नाग पंचमी, रक्षाबंधन करत पोळ्याला श्रावण संपतो. शीत प्रदेशात भयंकर थंडीनंतर आलेला वसंत, ऋतूराजाचा मान मिळवून जातो. महाराष्ट्राच्या हवामानात हाच मान वर्षा ऋतूचा आहे. पावसाने करडी आणि ऒसाड दिसणारी महाराष्ट्र भूमी प्रथम हिरवी गार होते व मग रंगीबेरंगी फुलांनी नटते. हे गीत तुम्ही गायचे आहे. मी फक्त चाल सुचवतो आहे video

Friday, July 3, 2009

गणिताचा गुरुमंत्र

video
The Marathi language song attempts to remove fear of maths from the minds of school going children. The song can be performed at school gatherings by children.

Wednesday, June 3, 2009

आ ऽ ली जल्लोषात वरात Aalee Jalloshaata Waraata

videoA Marathi language post wedding song. "Waraata" is a Marathi word for Post-Wedding Procession wherein the Groom takes the bride home ceremoniously. The song tries to depict the spirit of the momentous occasion.

Monday, April 20, 2009

गृहप्रवेश गीत

A Marathi language post-wedding song to welcome the bride.
video

Saturday, March 28, 2009

वऱ्हाड आलं हो वऱ्हाड

videoविवाह पूर्वसंध्या गीत. लग्नाच्या आदल्या दिवशी वाङनिश्चय आणि सीमंतपूजन होते. या कार्यक्रमांच्या मध्ये दोन्ही पक्षांच्या नातेवाईकांच्या भेटी घडवून आणल्या जातात. या तीनही प्रसंगांना गुंफून हे गीत रचलेले आहे. मी याला दिलेली चाल तुम्ही पटकन ऒळखाल. ’त्या’ गाण्याचे काराओके करून हे गीत म्हणून पहा, खूप मजा येईल.

Sunday, March 22, 2009

देवनागरीत विचार मांडा!

अर्थपूर्ण आवाजाला भाषा म्हणतात. भाषा बोलली आणि ऐकली जाते. भाषेला लिपीने आकृतीबद्ध केले. आपण मराठी भाषेत बोलतो आणि देवनागरी लिपीमध्ये लिहितो. तांत्रिक दृष्ट्या मराठी आपली बोलीभाषा आणि देवनागरी ही आपली लेखीभाषा. हिंदी आणि संस्कृत या बोलीभाषांची लेखीभाषा देवनागरीच आहे.
बोलीभाषेसाठी बोलायला तोंड आणि ऐकायला कान ही दोन इंद्रिये लागतात. लेखी भाषेसाठी वाचायला डोळे आणि लिहायला हात ही दोन इंद्रिये लागतात. जन्मानंतर मूल आवाजापासून सुरुवात करून बोलीभाषेपर्यंत अनुभव घेत घेत मजल मारते. शुद्ध भाषा ऐकायला मिळाली तर मूल शुद्ध बोलू लागते. लेखीभाषा शिकण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे लागते. सर्वसाधारणपणे हे शिक्षण शाळांमधून मिळते. हे शिक्षण दोन प्रकारचे असते, डोळ्यांनी अक्षरओळख शिकावी लागते आणि हाताने ते अक्षर गिरवायला शिकावे लागते. व्याकरण आणि शब्दसंग्रह या दोन गोष्टी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी अत्यावश्यक आहे.
मराठी भाषिक व्यक्तीला बोलीभाषा आणि लेखीभाषा, दोन्हींचे, बऱ्यापैकी ज्ञान शाळेमध्ये मिळते. पण आजकाल कॉलेजमध्ये गेल्यावर बोलीभाषा मराठीच राहते, मात्र लेखीभाषा इंग्रजी होते. संगणक आल्यापासून भाषा लिहिण्यासाठी अक्षरे गिरविण्याची आवश्यकता राहिलेली नही. सर्वसाधारणपणे संगणकात रोमन लिपीचा की-बोर्ड असतो. त्यामुळे संगणकावर इंग्लीश भाषा लिहिणे सोपे जाते. काही वर्षात अशा मराठी व्यक्तींना मराठीत हाताने लिहिता येत असले तरी देवनागरीचा स्टॅडर्ड फ़ॉंट नसल्यामुळे स्टॅडर्ड की-बोर्ड नाही म्हणून संगणकावर देवनागरीमध्ये लिहिता येत नाही.
दररोजच्या कामासाठी देवनागरीत लिहिण्याची जरूरत नसल्यामुळे अशा मराठी व्यक्तींना देवनागरीत लिहायला प्रवृत्त कसे करायचे , हा एक गहन प्रष्न होता. पण त्रांसलिटरेशन टूल आल्यामुळे हे काम सोपे झाले आहे. मराठीचे इनपुट रोमन लिपीमध्ये या टूलच्या साह्याने संगणकात टाकले की त्याचे आऊटपुट देवनागरीमध्ये मिळते. ते आऊटपुट कॉपी/स्पेशल कॉपी करून साध्या देवनागरीमध्ये/युनीकोडमध्ये कन्व्हर्ट होते. युनीकोडमधले देवनागरीचे आऊटपुट इंटरनेटवरही वापरता येते.
सध्या खूप साऱ्या मराठी भाषिकांना इंटरनेटवर देवनागरीत आपले विचार मांडता येत नाही, ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी या ट्रांसलिटरेशन टूलचा प्रचार करणे जरूरीचे झाले आहे.
इंटरनेटवर तर हे खूप सोपे आहे. हे टूल मिळविण्यासाठी सर्च इंजिन वपरायचे आहे. बस्स! तसे पाहिले तर भारतात इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ई-मेलसाठी हे टूल देत आहेत. निदान ई-मेल तरी देवनागरीमध्ये करता येते, हे इंटरनेटवरच्या मराठी नेटिझन्सना लक्षात आणून दिले पाहिजे. पण हे टूल वापरण्यासाथी इंटरनेटवर असणे आवश्यक आहे. इंटरनेटवर असे टूल मोफत मिळते. ते डाऊनलोड करून घेतले की केव्हांही वापरता येते. इंटर्नेटवर देवनागरीत ब्लॉगईंगसाठी तर हे खूपच कामी येते.
संगणकावर आणि इंटरनेटवर देवनागरीचा उपयोग वाढविण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपल्या आप्तस्वकीयांचे मन वळवायला पाहिजे.

Friday, March 20, 2009

न्युझीलॅंडमध्ये जय हो!

जय हो! न्युझीलॅंड विरुद्ध भारतीय क्रिकेटरांनी खूपच छान प्रदर्शन केले आहे-तेही फ़ास्ट पिचवर. तेंडुलकरने तर कमाल केली. बेचाळीस टेस्ट शतके म्हणजे जोक नाही. या विजयावर फक्त जल्लोष करून विसरून जायचेनाही. अशा विजयांतून प्रेरणा घेऊन स्वत:ही काही तरी करण्याचे ध्येय स्वत:समोर ठेवायला पाहिजे. या निवडणुकीत तरुण मंडळी काय करतात या कडे देशाचे लक्ष आहे.